Sunday, October 17, 2010

जीवाची मुंबई

                           मी मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातला एका छोट्या गावातला... पण आम्हा कोल्हापूर जिल्ह्यातल्याना आमच्या या भागाचा अभिमान फार ... पण मी गावात कधी राहिलोच नाही , वडिलांची सरकारी नोकरी असल्या मुळे आम्ही कधी कोंकण, मिरज ... असे बाहेरच राहिलो ...
         माझा जन्म कोकणात कणकवली इथे झाला, राणे साहेबांच्या मूळे कणकवली famous आहेच.. नंतर बालवाडीला मी तिलारी गोव्या जवळ कोकणातच होतो.  मग शाळेला कोयना आणि मिरज... college ला सांगली आणि सोलापूरला होतो.. नंतर काही दिवस सातारा आणि मग पुणे आता मुंबई... आहे कि नाही माझा चांगलाच महाराष्ट्र दर्शन .... मी असा खूप ठिकाणी राहिलो वेग वेगळे लोक पहिले.. कोकणातील लोक निवांत आणि खूप सध्या मनाचे ... 
         तसे मुंबई पण कोकणच म्हणे पण इथली लोक काही साधी आणि निवांत नाहीत... ती धक्काबुक्की च्या गर्दीत माझे हे दिवस काढतोय... माझ्या शिक्षणाचे पण असच मी जसा गोण बदललो तसे आहे.. engineering केलो electronics मध्ये, interest होतं designing- creativity मध्ये अनिनोकारी करतोय software मध्ये.. 
       असो ..  रोज office ९.४५ ते ६.४५ असते. मला घरून निघावा लागतं ८.२६ ला आणि परत येतो ७.५६ ला ऐकून माहित होतं मुंबई चे जीवन खूप fast असतंय आणि आता प्रत्यक्ष अनुभवतोय.. इथे सगळे मिनिटावर आणि सेकंदावर खेळ चालतो. माझी लोकल ८.३७ ला असते, मी ऑफिसला पोहचतो ९.१८ ला माझे काम चालू होते ९.२३ ला ... हे असच exact  मिनिटात बोलणे म्हणजे मुंबईचे जीवन.. नाही तर आमच्या गावाकडे ८.३७ म्हणजे अरे पाहुणे नऊला ट्रेन जा निवांत .... हे इथे चालत नाही.. 
       सकाळी छान tight इस्त्री केलेला shirt घालून ऑफिस ला जातो. पोहचलो कि wash room मध्ये जाऊन शिरत ताणून inshirt करायचा.. चुरगललेला shirt इस्त्रीचा आहे असा वाटावा म्हणून, आणि चुकून पण रुमाल विसरून गेलात म्हणजे तुमचे हालच हाल... मी तर म्हणतो रुमालपेक्षा टोवेलच घेऊन जावं, नाहीतर काय ... आंघोळ झाल्यावर आपण कधी रुमालाने अंग पुसतो का ? तशीच गत झालेली असते मुंबईच्या वातावरणात ...
       मुंबईतले लोक म्हणजे त्याहून भारी, मुंबईचे लोकल ट्रेन खूप famous आहे, ऑफिस time ला खूप गर्दी असते .. सकाळी ८.३० ते १०.30 संध्याकाळी ५.३० ते ७.३० full rush.. तुम्हाला ट्रेन मध्ये चढायचे असेल तर पोट भरून जेवण करून यायचा आणि जोरात दाबून ढकलत आत शिरायचं, नाहीतर तुम्ही कधीच ट्रेन मध्ये चढू शकणार नाही .. first class मध्ये थोडं बर असते .. अरे मी गर्दी बद्दल नाही बोलत, तिथे हि तेवढीच गर्दी असते फक्त लोक चांगले असतात.. आता तुम्ही म्हणाल general डब्यात लोक काही चांगले नसतात... तुम्हाला मुंबईच्या लोकांचा स्वभाव माहित नाही.. काही लोक भांडायलाच उभे असतात .. जरा धक्का लागला कि राडा चालू.. पण कधी त्यांच्याशी भांडायचं नाही, नाहीतर बाकीचे पण एकत्र येऊन भांडणाचे कारण माहित न करता चूक नसते त्यालाच बडवतात .. 
      ट्रेन मध्ये काहींची बसायची धडपड , काहींची फान खाली उभे रहायची धडपड तर काहींची दाराला उभे रहायची धडपड असते , आणि मी चढायला तर मिळतंय कि नाही , मिळालं तर उभारायला मिळतंय कि नाही एवढाच पाहत असतो..  मज्जा म्हणजे .. परवा ट्रेन मध्ये मला नशिबाने बसायला जागा मिळाली, मला जरा गड जिंकल्यासारखाच वाटलं... तुम्हाला तर माहीतच आहे मुंबईचे जीवन किती fast , तसल्या गर्दीत पण माझ्या शेजारी बसलेला कॉम्पुटर वर काही तरी काम करत होता.. मी थोडं डोकावून पहिलो.. त्यात काही तरी कॉम्पुटर security training बद्दल होतं.. मी पण आता web security testing करतोय ना, म्हणून उस्तुकतेने त्याला विचारलो..." तुम्हाला security बद्दल माहित आहे का? " तो माझ्यावर संतापला आणि म्हणाला, manners आहेत कि नाही.. दुसर्याच्या laptop मध्ये , कामात डोकावून बघतोस .... मी sorry म्हणालो आणि गप्प बसलो. 
      असाच एक किस्सा माझ्या ऑफिस मध्ये झाला, माझ्या डेस्कच्या मागे account section चे employee बसतात, जास्त करून सगळ्या मुलीच आहेत. त्यातल्या एका मुलीचे चुकून hello tune activate झाले होते, ती तिच्या मैत्रिणीला ओरडून सांगत होती, आणि airtel च्या नावाने बोंब मारत होती, माझे पण एकदा असे झाले होते, मी customer care ला फोन लाऊन ओरडून बंद करवला होतं आणि request वरून माझे पैसे पण refund झाले होते..म्हणून मी मदतीच्या नात्याने सांगायला गेलो , "तुम्ही त्यांना थोडं ओरडून सांगितलं तर refund पण होईल " पण तीच माझ्यावर खवळली आणि म्हणाली "दुसर्यांच्या गप्पा ऐकायला ऑफिस मध्ये येतोस काय..? काम कर..." मी sorry म्हणालो आणि गप्प बसलो. 
      काही लोक तर जास्तच बिनधास्त .. २ दिवस झाले होते मी कंपनी join करून , माझ्या team मध्ये   एक मुलगी आहे, २ दिवसात बोलता बोलता ती मला डार्लिंगच म्हणाली... आता मी काय म्हणू... ??
      हे असे लोक... असो मुंबईचा पाउस पण मुंबई सारखाच बर का ...!!!बाहेर जोरात पाउस पडत असेल पण आत चांगलाच घाम येईल...fan compalsory , मला वाटतंय मुंबई चे लोक लग्नाच्या हुंड्यात fan  च मागत असतील. 
      मुंबईत थोडा जरी जोरात पूस पडला कि लगेच गुडघा भर पाणी साठलाच म्हणून समजा.. मग आम्ही राजे आता पाउस चालू झाल्यापासून ऑफिसला जाताना चप्पल घालून जातो आणि तिथे गेल्यावर shoes . माझ्या bag मध्ये डब्बा, shoes , छत्री आणि deodorant (deodorant must आहे हं ...) यांनीच माझी bag भरलेली असते .. 
        माझा दिवस कधी चालू होतो आणि कधी संपतो काही काळतच नाही...........
                            अशी हि माझी जीवाची मुंबई..............

No comments:

Post a Comment