मी मोकळा असलो कि जुन्या आठवणी ताज्या करत असतो... आणि करायला हि हवा ना.... आठवणी ठेवायच्या कशाला मग... असाच मी एका रविवारी lappy वर किडे करत होतो, इतक्यात mobile वर तिचा sms झळकला... मग gmail वरच्या तिच्या फोल्डर मधील mail वाचले.. मी तिला कित्येक mail लिहून पाठवलेत.. मी तिचे केलेले वर्णन... माझ्या शब्दातून तिच्या आणि माझ्या भावनांची ओळख ... माझी कमी वेळात झालेली मैत्रीण... असे अनेक वर्णन तिच्याबद्दलचे , जेवढे करेल तेवढे कमीच आहे म्हणा..
माझा मन वाहत होतं... आता हि वाहत.. कधी कधी माझं मन अनेक ठिकाणी फिरून येतं आणि अनेक विचाराने गुरफटून येतं आणि माझं मन त्याप्रमाणे पाझरत. माझ्या काही लिखाणाचा विषय हि तीच असते..
म्हणूनच ....
त्या सर्व कविता, लेख
माझ्याही नकळत
तुझ्याच साठी लिहिलेल्या
मनाच्या पानापानातून
तुझ्या स्वभावांचे अनेक प्रकार
तुझ्या बद्दल माझ्या मनात
असलेला आकार, उकार..
जर त्या तुझ्यापर्यंत पोहोचल्या तर?
तर... तुझा माझ्यावर असलेला विश्वास ,
तुझं मनमोकळ बोलणं ..
हे जिवापलीकडे जपलेले सर्व काही
करेल आपल्या मैत्रीचा बंध घट्ट...
मला हि कळतंय ....
तुझ्याशिवाय त्या कविता अपूर्ण
आहेत आणि राहतील...
जास्त मोलाचं काय आहे ?
त्या रंगवलेल्या कविता?
कि तुझं असणं?
माझ्यासाठी फक्त आणि फक्त
आपली निखळ मैत्री....
No comments:
Post a Comment